Saturday, January 21, 2023

सातवी पिढी..!

जुन्या काळात प्रत्येक गावाला गायरान जमीन असायची. गावातील जित्राबे अर्थात गोधन तिथे चरत असते. त्या माळरानावरच गाईंचे आणि म्हशींचे पोषण होणार. थोडक्यात खायला घालायचा खर्च शून्य होता. 

शेण आणि गोमुत्र शेतात वापरले जाई... उन्हाळ्यात शेतात मेंढपाळ मेंढ्या आणून रात्री मुक्काम करत. त्यांच्या लेन्ड्यांचे खत शेताला होत असे. 

शेत जमीन बैल नांगरत असत. त्यामुळे शेतातील गांडूळ हे शेत जमिनीला सच्छीद्र ठेवण्याचे कार्य करत असत. 

दुध हे जवळ जवळ फुकट असे.. त्यामुळे ते किती निघते आहे याचा विचार कोणी करत नसे. घरच्या पुरते निघाले तरी खूप आहे हाच भाव असे. 

गायी आणि बैल जवळ जवळ फुकट चरत असत. थोडेफार अतिरिक्त म्हणजे शेंगदाण्याची पेंड द्यायची, घरातील आंबोण द्यायचे आणि वरून लागलेच तर शेतातील पिकांचीच उरलेली वैरण घातली जाई.  गोधनाचे ओझे वाटत नसे.  

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा खेड्यातून ब्राह्मण हाकलून दिले... 

मग गावातील पुढार्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करायला दलितांना उद्युक्त केले. 

मला सांगा स्वातंत्र्याच्या पूर्वी पण गावात दलित रहात होतेच ना ? त्यांना राहायला जागा होतीच ना ? 

पण स्वातंत्र्याच्या नंतर गायरान जमिनींवर अतिक्रमण करायची काय गरज पडली असेल , याचा विचार करा.

मी पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे दलितांची अतिक्रमणे फक्त १० %  असतील. बाकीच्या सगळ्या जमिनी या गावातील गुंडांनी आणि पुढार्यांनी हडप केल्या आहेत. 

मग स्वातंत्र्यानंतर आपल्या सगळ्याच प्रशासनाला दलितांचा उमाळा आला होता. त्यामुळे गायरान जमिनींची सगळी अतिक्रमणे नियमित केली गेली.. रामदास आठवले या माणसाचे राजकीय करियर त्यावर घडले आहे.. 

या षडयंत्रात जोवर आठवले होते तोवर ते साधत होते आणि तोवरच ते पवारांचे लाडके होते. हा कार्यभाग संपला की आठवले यांना दूर केले गेले.. 

गायरान जमिनी संपल्या आणि मग शेतकऱ्याला गोधन स्वतः पोसण्याची वेळ आली. आता हा अव्यापारेषु व्यापार सुरु झाला. कारण गायीचे दुध इतके जास्त नसते की त्यातून तिच्या सर्व पालनपोषणाचे खर्च भागतील.. 

म्हणून मग जर्सी गायी आणि म्हशी वाढल्या... जर्सी गायी देशात आणताना नेत्यांनी खा खा पैसे खाल्ले.

यात देशी गोधन उध्वस्त झाले. म्हणजे ब्राझील आपल्या गायींची सुधारित जात निर्माण करतोय आणि आपण आपल्या देशी गायींचे वाण राखण करण्यात अपयशी ठरतोय.

आता म्हैस पोसणे परवडावे म्हणून ऑक्सिटोसिन हे संप्रेरक इंजेक्शन आले. त्याचा वापर सुरु झाला. ते बेकायदेशीर आहे पण धडल्ल्याने सुरु झाला आहे. 

यामुळे असे दुध पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात हार्मोन्स चे संतुलन ढासळू लागले आहे.

आजकाल बहुसंख्य आयुर्वेदिक डॉक्टर लहान मुलांना दुध देऊच नका असे चक्क सांगू लागले आहेत. 

कारण हार्मोन्स चे संतुला हरपले की मुली वयात लवकर येतात. हे संतुलन ढासळवणारे घटक म्हणजे अन्न. 

पहिले झाले संप्रेरक इंजेक्शन मारलेल्या जनावरांचे दुध आणि 

दुसरे अन्न म्हणजे कृत्रिम रित्या किण्वन प्रक्रिया करून तयार होणारे अन्नपदार्थ अर्थात सर्व स्वरूपाचे बेकरी उत्पादन. यात किण्वन कृत्रिम पद्धतीने केले जाते आणि हे अन्न पोटात गेल्याने सुद्धा हार्मोन्स चा balance ढासळू शकतो.  

आणि तिसरे डोळ्यांवर होणारा सेक्स चा भयंकर मारा..... 

यात आई बाप बेअक्कल झाले आहेत.. माझी पोरगी बॉलीवूड गाण्यावर किती छान नाचते वाली क्रेझ या मुलींचे बालपण गिळून टाकत आहे. सिरियल्स मधील व्यभिचार, चित्रपटातील आयटम सोन्ग्स नावाचे पोर्न. 

या लहान मुलींना वेगळे पोर्न पहाण्याची गरजच नाही.. टीव्ही , चित्रपट soft porn तुम्हाला रोज खायला घालतच आहे. 

परिणाम....

मुलींची पाळी लवकर येते आहे... 

या विषयावर एक तरी समाजशास्त्रज्ञ बोलताना दिसतो आहे का ?

शेतीच्या पातळीवर आपण नैसर्गिक खत वापर जवळ जवळ बंद केला आहे. त्यामुळे शेतात शेण गोमुत्र टाकणे, मेंढ्या बसवणे या गोष्टी घडत नाहीत. जोडीला tractor चा वापर सुरु झाला ज्यामुळे जमीन खोलवर नांगरली जाते आणि उलटीपलटी केली जाते , ज्यात जमिनीच्या पृष्ठभागालगत असणारे गांडूळ आणि अन्य सूक्ष्मजीव सूर्याच्या प्रकाशाला एक्स्पोज होऊन मरतात. शेतीची सच्छीद्रता संपते... 

आपण युरिया वापर सुरु केला आणि गांडूळ मारून टाकला. आता आपली शेतभूमी सच्छीद्र नाही. कारण नैसर्गिक jcb जो जमीन सच्छीद्र ठेवायचा तोच जागेवर नाही... परिणाम थोडा पाऊस पडला तरी आपली पिके नासून जातात. कारण पाणी जमिनीत मुरतच नाही. 

युरियाचा मारा केलेले पिक सुध्दा आपल्या पोटात जाते आहे त्याचा परिणाम सुद्धा हार्मोन्स चे संतुलन ढासळवण्यास कारणीभूत होतो आहे. 

या निंदनीय कृत्याला कळत न कळत शेतकरी कारणीभूत होतोय... हे त्याला तरी उमजते आहे का ?

हे सगळे चक्र उलट फिरवल्याशिवाय आपण अन्न म्हणून जे विष खातो आहोत ते थांबणार नाही. 

यातला सर्वात मुख्य घटक गाय आहे आणि तिला नीट पोसायचे असेल तर गायरान जमीन असणे आवश्यक आहे.  

यातला एक जरी मुद्दा चुकीचा वाटला तर शेतकरी बंधूंनी आणि मित्रांनी सांगावे. बदल केला जाईल... 

पण यात शेतकरी बंधूंनी हे सुद्धा समजून घेतले पाहिजे की गेले ४०-५० वर्ष तुम्ही ज्यांना निवडून देत आहात त्यांनी तुमचा आणि समाजाचा नक्की कुठे आणि कसा गळा कापला आहे. 


                                                 श्री पाटील..

No comments:

Post a Comment