एका विद्यार्थ्याने, खोडी करत,
त्याच्या मित्राच्या पाठीवर एक कागद चिकटवला, ज्याच्यावर लिहिले होते, "मी
मूर्ख आहे." त्या मुलाला याबद्दल काही कळू द्यायचे नाही, असे त्याने इतर
विद्यार्थ्यांनाही सांगून ठेवले होते.
अशाप्रकारे दिवसभर बाकीचे विद्यार्थ्यी
त्या मुलावर हसत होते. काही वेळाने गणिताचा तास सुरू झाला आणि त्यांच्या
शिक्षकांनी फळ्यावर एक कठीण गणित मांडले.
त्याचे उत्तर लेबल लावलेल्या
मुलाव्यतिरिक्त कोणालाही देता येत नव्हते. तो मुलगा फळ्याजवळ गेला आणि ते गणित
त्याने सोडवले, पणं त्याला ह्याची अजिबात जाणीव नव्हती, की त्याच्या पाठीवर
असलेल्या लेबलमुळे सगळे विद्यार्थी त्याच्यावर मनातल्या मनात हसत आहेत.
आता शिक्षकांनी त्या मुलासाठी
सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितले आणि मुलाच्या पाठीवर चिकटवलेला तो कागद काढून
टाकला, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती.
शिक्षक त्या मुलाला म्हणाले, "मला
वाटतं की तुझ्या पाठीवर चिकटवलेल्या या कागदाबद्दल तुला काहीच माहीत नव्हते, जो
तुझ्या एका मित्राने चिकटवलेला होता आणि इतर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट तुझ्या
पासून लपवून ठेवली होती. नंतर शिक्षक बाकीच्या वर्गाकडे वळून
म्हणाले, "तुम्हा सगळ्यांना शिक्षा करायच्या आधी, मी दोन गोष्टी सांगणार आहे
:
पहिली गोष्ट म्हणजे, तुमच्या संपूर्ण
आयुष्यात, लोकं तुमची प्रगती थांबविण्यासाठी, तुमच्या पाठीमागे अनेक वाईट
गोष्टींची लेबलं लावतील. जर या मुलाला, पाठीवर चिकटवलेल्या
लेबलबद्दल माहीत असते, तर तो प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी उठलाच नसता.
तुम्ही तुमच्या जीवनात फक्त एवढंच करा
की, जेव्हां लोकं तुम्हाला लेबल लावतील, तेंव्हा त्याच्याकडे कानाडोळा करा आणि
तुमची प्रगती, शिक्षण व स्वतःला अधिक चांगले घडवायच्या प्रत्येक संधीचा फायदा करून
घ्या.”
“दुसरं म्हणजे, आता, हे स्पष्टंच झाले आहे की, तुमच्यापैकी कुणीही या
मुलाचा प्रामाणिक मित्र नाही, ज्याने
त्याला ते लेबल काढायला सांगितले असते. तुम्हांला किती मित्र आहेत याने काही फरक
पडत नाही. मात्र, तुमच्या आणि मित्रामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाला महत्त्व आहे.
जर तुम्हांला असे मित्र नसतील, जे
तुमच्या पाठीमागे तुमचे रक्षण करू शकतील, वेळ-प्रसंगी तुम्हाला सांभाळून घेतील आणि
खरोखरच तुमची काळजी घेतील, तर तुम्ही एकटे राहणंच अधिक चांगलं आहे.”
श्री पाटील..
No comments:
Post a Comment