Saturday, January 21, 2023
अंबर..!
चेहरे..!
मोठेपणा..!
ओझं..!
गुलदस्ता..!
टाईमपास..!
ना खंत ना दुःख..!
सातवी पिढी..!
दोष हा कुणाचा..!
घर ओसाड झालेले..!
माहेरची मदत सासरचा घाटा..!
बाप लेकाचा अनोखा खटला..!
राधा ही बावरी..!
आमचं हळदी कुंकू..!
असेही एक वडील..!
Friday, January 20, 2023
लेबल..!
एका विद्यार्थ्याने, खोडी करत,
त्याच्या मित्राच्या पाठीवर एक कागद चिकटवला, ज्याच्यावर लिहिले होते, "मी
मूर्ख आहे." त्या मुलाला याबद्दल काही कळू द्यायचे नाही, असे त्याने इतर
विद्यार्थ्यांनाही सांगून ठेवले होते.
अशाप्रकारे दिवसभर बाकीचे विद्यार्थ्यी
त्या मुलावर हसत होते. काही वेळाने गणिताचा तास सुरू झाला आणि त्यांच्या
शिक्षकांनी फळ्यावर एक कठीण गणित मांडले.
त्याचे उत्तर लेबल लावलेल्या
मुलाव्यतिरिक्त कोणालाही देता येत नव्हते. तो मुलगा फळ्याजवळ गेला आणि ते गणित
त्याने सोडवले, पणं त्याला ह्याची अजिबात जाणीव नव्हती, की त्याच्या पाठीवर
असलेल्या लेबलमुळे सगळे विद्यार्थी त्याच्यावर मनातल्या मनात हसत आहेत.
आता शिक्षकांनी त्या मुलासाठी
सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितले आणि मुलाच्या पाठीवर चिकटवलेला तो कागद काढून
टाकला, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती.
शिक्षक त्या मुलाला म्हणाले, "मला
वाटतं की तुझ्या पाठीवर चिकटवलेल्या या कागदाबद्दल तुला काहीच माहीत नव्हते, जो
तुझ्या एका मित्राने चिकटवलेला होता आणि इतर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट तुझ्या
पासून लपवून ठेवली होती. नंतर शिक्षक बाकीच्या वर्गाकडे वळून
म्हणाले, "तुम्हा सगळ्यांना शिक्षा करायच्या आधी, मी दोन गोष्टी सांगणार आहे
:
पहिली गोष्ट म्हणजे, तुमच्या संपूर्ण
आयुष्यात, लोकं तुमची प्रगती थांबविण्यासाठी, तुमच्या पाठीमागे अनेक वाईट
गोष्टींची लेबलं लावतील. जर या मुलाला, पाठीवर चिकटवलेल्या
लेबलबद्दल माहीत असते, तर तो प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी उठलाच नसता.
तुम्ही तुमच्या जीवनात फक्त एवढंच करा
की, जेव्हां लोकं तुम्हाला लेबल लावतील, तेंव्हा त्याच्याकडे कानाडोळा करा आणि
तुमची प्रगती, शिक्षण व स्वतःला अधिक चांगले घडवायच्या प्रत्येक संधीचा फायदा करून
घ्या.”
“दुसरं म्हणजे, आता, हे स्पष्टंच झाले आहे की, तुमच्यापैकी कुणीही या
मुलाचा प्रामाणिक मित्र नाही, ज्याने
त्याला ते लेबल काढायला सांगितले असते. तुम्हांला किती मित्र आहेत याने काही फरक
पडत नाही. मात्र, तुमच्या आणि मित्रामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाला महत्त्व आहे.
जर तुम्हांला असे मित्र नसतील, जे
तुमच्या पाठीमागे तुमचे रक्षण करू शकतील, वेळ-प्रसंगी तुम्हाला सांभाळून घेतील आणि
खरोखरच तुमची काळजी घेतील, तर तुम्ही एकटे राहणंच अधिक चांगलं आहे.”
श्री पाटील..
वाळू आणि दगड..!
जॉन आणि जेम्स दोघे चांगले मित्र होते.
त्या दोघांच्यात अनेक वेळा काही कारणांनी भांडणं होत असत, पण त्यांनी त्यांची
मैत्री कधीच तोडली नाही. एकदा ते दोघे नोकरीच्या शोधात बाहेर पडले आणि पैसे
कमावण्यासाठी बऱ्याच ठिकाणी फिरु लागले. त्यांनी अनेक स्थळे, गावं, खेडी, जंगले
आणि समुद्रतटांना पार केले. पूर्ण यात्रे दरम्यान ते एक-दुसऱ्याला साथ देत राहिले.
एके दिवशी ते एका वाळवंटात पोहोचले.
त्यांच्या जवळ अन्न आणि पाणी फार कमी राहिले होते. जॉन म्हणाला की, "आपण
खायच्या वस्तू आणि पाणी पुढच्या प्रवासासाठी जपून ठेवायला हवे.” पण जेम्स नाराज झाला कारण त्याला तहान लागली होती
म्हणून पाणी प्यायचे होते. ते भांडायला लागले. जॉनने जेम्सला थप्पड मारली आणि नंतर
ते तेथून गप्प होऊन पुढे निघाले. जेम्सने वाळूवर लिहिले, “माझ्या सर्वात चांगल्या
मित्राने मला थप्पड मारली!”
शेवटी ते एका हिरवळीच्या प्रदेशात
(ओएसिस) पोहोचले. त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी पाण्यात खूप मस्ती केली.
जेंव्हा ते पाण्यात मस्ती करत होते, तेंव्हा जेम्स अनावधनाने पाण्यात बुडू लागला.
जॉन घाईने त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याचा जीव वाचवला.
जेम्सने मित्राला मिठी मारून त्याचे
आभार मानले. तेथे त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे जाण्याचा निर्णय
घेतला.
ते जायला निघणार, तेव्हां जेम्सने
दगडावर कोरले की, “आज माझ्या सर्वात चांगल्या मित्राने माझे प्राण वाचविले!”
तो जॉनला म्हणाला, "जेव्हां तू
मला थप्पड मारलीस, तेंव्हा मी ते वाळूवर लिहिले.आता वाऱ्यामुळे,मी वाळूवर लिहिलेले
पुसले गेले असेल.पणं जेंव्हा तू माझे प्राण वाचविलेस, तेव्हां मी ते दगडावर कोरले.कारण ते कायमस्वरूपी आता तीथेच
राहील.”
श्री पाटील..
Wednesday, January 18, 2023
स्त्री..!
काही सहस्त्र वर्षापासून विशेषता मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांवर अनेक बंधने आली होती. ' न स्त्री स्वातंत्र्यम् अह्रति' ही मनुस्मृति स्त्रीच्या तोंडावर सतत फेकली जात असे. चूल आणि मुल हेच तिचे कार्यक्षेत्र ठरवून तिला चार भिंतीच्या आत अडकवले गेले होते. दुबळी, अबला, अशी तिची टेहळणी केली जात असे, तर काही ठिकाणी गृहदेवता, स्वामिनी कोणत्या शब्दातील बंधनात टाकले जात असे. दागिन्यांनी मढलेली अर्धांगी कुणी आपल्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानत असे. पुन्हा ती आपल्या पायाची दासी वाटे.
गेल्या शतकात अनेकांच्या प्रयत्नातून स्त्री थोडी बंधनातून बाहेर पडत आहे. शिक्षणाची दारे खुली झाल्यावर तिने आपल्या प्रगतीचा वेग वाढला आहे. मानवी जीवनातील कोणते क्षेत्र तिला आता नवे राहिलेले नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात अगदी रणांगणावर ही आपली कर्तबगारी गाजवत आहे. आजही स्त्री मुक्त आहे, असे म्हणता येईल का ?
स्त्रीमुक्तीच्या या प्रश्नाचा विचार करताना दोन वेगवेगळ्या पातळीवर हा विचार केला पाहिजे. शहरी स्त्री आणि ग्रामीण पातळीवरील स्त्री. स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यावर त्या शिक्षिका झाल्या, प्राध्यापक, प्राचार्य, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, न्यायाधीश, संशोधक, वाहन चालक, अधिकारी, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख ही झाल्या, पण अशी ही कामगिरी करणाऱ्या स्त्रिया मूठ भरच. बाकीच्या सर्वसामान्य स्त्रियांचे प्रश्न सुटतात का ? खरोखर ती मुक्त झाली आहे का ?
ज्ञानरचना मुळे स्त्री ही आता गुलाम राहिली नाही. अगदी बंगल्यातील आणि झोपडीतही स्त्री आपल्यावर होणारा अत्याचार मुकाट्याने सहन करत नाही. पण म्हणून आज तिच्यावर अन्याय होत नाही असे नाही. झोपडीत राहणार्या गरीब स्त्रिया आज शहरात मजुरीची कामे करून चार पाच हजार रुपये कमावतात. त्यावर त्या आपल्या मुला बाळाची, कुटुंबाची गुजराण करतात. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलांना चांगल्या शाळेत घालतात. त्यामागे त्या माऊलीचा हेतू एकच असतो की, त्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे. पण अशा या कष्टकरी महिलांचे दारुडे पती कामधंदा न करता या स्त्रियांना मारहाण करून दारूसाठी पैसे उकळतात. म्हणजे स्त्री मुक्त आहे का ?
याला कारण आजही आपला समाज तिकडे थोड्या शशांक वृत्तीने पाहतो. आज-काल समाजातील घटस्फोटाचे प्रमाण वाढले असले, तरी अजूनही समाज त्या घटस्फोटित स्त्रियांकडे थोड्या उपेक्षेने पाहतो. समाजाची ही दृष्टी बदलायला हवी. आजची स्त्री सुशिक्षित स्त्री घरदार धोनी सांभाळत असते. ज्ञानसंपादन त्यामुळे तिला स्वतःचे क्षेत्र निर्माण झालेली असते, आज ते क्षेत्र गाजवत असते. सोबत आपले घरदार सांभाळत असते, मुलांच्या विकासासाठी धडपडत असते; परंतु ती मुक्त नसते. तिलाही आपले घर टिकवण्यासाठी होण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात; क्वचित स्वतःच्या मतांना, इच्छांना मुरड घालावी लागते.
अशा घरातून अनेकदा हुंड्यासाठी तिला जाळण्यात येते, तिची हत्या केली जाते. क्वचित तिच्यावर बलात्कार केला जातो. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा करून स्त्रीवरील अन्यायास संपणार नाही. पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ हा मुळातील अन्यायकारक दृष्टिकोन नाहीसा झाला पाहिजे. खरेतर सर्व माणसे समान आहेत, या तत्त्वाला आपल्या जीवनात जेव्हा मानाचे स्थान मिळेल, तेव्हा स्त्रीला सुद्धा समाजात मानाचे स्थान मिळेल. आत्मनिर्भर, मुक्त स्त्री निर्माण होईल व त्यातून निकोप आणि निर्भीड समाज निर्माण होईल.
आज बातम्या आणि वृत्तपत्रांमध्ये स्त्रियांवर होण्याला अन्याय-अत्याचार, घरगुती हिंसाचार अशी कित्येक उदाहरणे दररोज बघायला मिळतात. एकीकडे आपण स्त्री स्वातंत्र्याची आणि मुक्तीचे गोडवे गातो दुसरीकडे अजूनही काही स्त्रिया पारतंत्र्यात बंदिस्त आहेत. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी संपूर्ण स्त्री जीवन पूर्णपणे स्वातंत्र्य नाही ही चिंतनीय व खेदाची बाब आहे. त्यामुळे नारी सम्मान, स्त्री सन्मान तसेच स्त्रियांना त्यांचा दर्जा आणि प्रत्येक कार्यात सहभाग संधी दिल्यास नक्कीच स्त्री पुरुष समानता ही तुलना करण्याची कधी वेळच येणार नाही.
श्री पाटील..